Showing posts with label Jalgaon Anubhav kathan. Show all posts
Showing posts with label Jalgaon Anubhav kathan. Show all posts

Wednesday 6 September 2017

Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan

संकट हे कोणालाच चुकले नाही. प्रारब्धानुसार ज्याला त्याला आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना हा करावाच लागतो. फरक कुठे होतो, तर जो सद्गुरुंच्या छत्रछायेखाली आहे, त्याला कुठून ना कुठून संरक्षण मिळते, संकटात अचानक कुठूनतरी मदत उभी राहते, मनाधार मिळतो, हा बहुतेक सद्गुरुभक्तांचा अनुभव आहे.
 - जीजाबराव सोनवणे, जिराळी (जळगाव)

मी २००४ मध्ये अनिरुद्धबापूंच्या सेवाकार्यात प्रथम भाग घेतला. त्यानंतर मला सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे अनेक अनुभव आले.
मला पहिला अनुभव २००८ मध्ये आला. माझी पत्नी, चार मुली व मोठा मुलगा असा माझा परिवार आहे व बापूंच्या कृपेने सुखात चालत होता. माझी दोन नंबरची मुलगी गरोदर होती. तिची प्रसूतीची तारीख दिली होती, ३० जुलै २००८. म्हणून मी माझ्या मुलीस भेटावयास २६ जुलैला जळगावमधील मु.पो. मोहाडी येथे गेलो.

योगायोगाने ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी, म्हणजे शनिवारी मुलीचे पोट दुखावयास सुरुवात झाली. त्यावेळी माझ्या मुलाने गावातील नर्सला बोलावले. तिने खूप प्रयत्न केले परंतु यश येत नव्हते. तेव्हा त्या नर्सने सांगितले की तुम्ही कुठेतरी दवाखान्यात घेऊन जा.

घरातील मंडळी घाबरली. आता बापूंशिवाय कोण आधार? म्हणून लगेच बापूंचे नामस्मरण सुरू केले. आमच्याजवळ असलेली संस्थेची उदी तिला पाण्यात टाकून पाजली व थोडी कपाळास लावली व बापूंना सांगितले की ‘बापू, तुम्हीच तुमच्या नातवाला सांभाळा!’

तोच काय चमत्कार! तेवढ्यात माझ्या मुलीला - स्वतः बापूच आमच्या घराच्या उंबरठ्याजवळ येऊन उभे राहिले आहेत असे दृश्य दिसले. मुलगी ओरडलीच, ‘‘अगं आई, बघ बापू आले’’ आणि असे म्हणत तिने बापूंचा जयजयकारही केला - ‘जय बापूराया, जय बापूराया’!

इतके होतेय तोच बापूंनी उजवा हात वर करून आशीर्वाद दिला असे तिला दिसले; आणि अक्षरशः त्यानंतर लगेचच मुलीची डिलिव्हरी झाली सुद्धा....तिला मुलगा झाला! अनुभवी नर्सलाही जी डिलिव्हरी गुंतागुंतीची (‘कॉम्प्लिकेटेड’) वाटत होती, ती माझ्या बापूंच्या कृपेने किती सुलभरित्या झाली! खरंच बापूराया, आमच्यासारख्या सर्वसामान्य भक्ताने मारलेल्या हाकेलाही धावून आलास....मी तुझे कसे ऋण फेडू?

दुसरा अनुभव असा की आम्ही जिराळी व इंधवे केंद्र मिळून १४ माणसे एकत्र खाजगी गाडी करून गुरुवार दि. १७ डिसेंबर २००९ रोजी ठीक ६ वाजता बापूंच्या प्रवचनासाठी बांद्रा न्यू इंग्लिश स्कूल येथे गेलो. त्या वेळेस बापू गुरुक्षेत्रम्मध्ये स्वतःच्या हाताने उदी देत असत. त्याकरिताही दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी आमचा नंबर लागला होता. शिवाय गुरुवारी प्रवचनस्थळी आम्हाला पुष्पवृष्टीची सेवा मिळाली होती म्हणून आम्हां सर्वांना फारच आनंद झाला होता. पण नेमके त्या दिवशी बापू काही प्रवचनास आले नाहीत. माझ्याबरोबर आलेल्यांतील काही लोकांचा धीर सुटून ते त्यावरून बापूंवर शंका घेऊन तक्रारीच्या सुरात काहीबाही बोलू लागले. त्यांचे म्हणणे होते की ‘तुम्ही म्हणता बापूंना सगळं कळतं, मग आपण एवढे लांबून एवढा खर्च करून आलो आणि बापूंनी दर्शन का नाही दिलं ?’, वगैरे वगैरे.

त्यानंतर आम्ही सद्गुरु गुणसंकीर्तनसत्संग ऐकत त्या स्कूलच्या पटांगणात बसलो असता रात्री ९ वाजता एकाच्या मोबाईलवर घरुन फोन आला की आपल्या गावामध्ये गारांचा पाऊस पडला....एवढा की संपूर्ण गावभर गारांचा दोन फुटाचा थर जमिनीवर लागला आहे. माझ्या घरूनसुद्धा फोन आला. प्रश्न होता आम्हा सर्वांच्या शेतजमिनीचा. पीकांची सर्व नासाडी झाली असणार ह्या विचाराने कोणाचेच मन त्यापुढील सत्संगात लागत नव्हते. मनात बापूंची आळवणी सुरूच होती की बापुराया, हे असे कसे झाले?

दुसर्‍या दिवशी आम्हाला गुरुक्षेत्रम् येथे बापूंच्या हस्ते उदीचा प्रसाद मिळणार होता. म्हणून आम्ही कुर्ल्याला, इंधपे येथील अनिरुद्ध उपासना केंद्राचे प्रमुख सेवक श्री. महेंद्र निंबा पाटील यांच्या बहिणीचे घर आहे, त्यांच्या घरी मुक्कामाला राहणार होतो. त्यामुळे वांद्रे येथून आम्ही कुर्ल्याला त्यांच्या घरी गेलो. बाकीची मंडळी ‘लगेच गावाला जायला निघूया’ म्हणून सांगत होती, पण ‘नशिबाने उदीप्रसादासाठी नंबर लागलाय, तो गमावू नका’ असे म्हणून कुर्ल्याच्या पाहुण्यांनी कोणासही घरी निघू दिले नाही व आमचा चांगला पाहुणचार केला.

ती रात्र तशीच गावच्या संकटाचा विचार करण्यात गेली. सकाळी उदी प्रसादाचा लाभ होता परंतु ह्या गारांच्या पावसाने आमच्या शेतांचे किती नुकसान झाले असेल ह्या विचाराने आमचे कोणाचेच चित्त लागत नव्हते.

शेवटी बापूलाच दया आली बहुतेक....सकाळी ७ वाजता माझ्या घरून मुलाचा फोन आला की आपल्या शेताचं विशेष नुकसान झालेलं नाही, आपल्या शेतात गारांचा पाऊस फारच कमी होता. माझा जीव भांड्यात पडला व मी उलटसुलट विचार करून सद्गुरुंना त्रास दिल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली.

आश्‍चर्य म्हणजे हे इतक्यावरच थांबले नाही, तर आम्ही जेवढे चौदाजण तिथे आलो होतो, त्यांतल्या प्रत्येकाच्याच घरून आता फोन येऊ लागले की आपलं शेत सुखरूप आहे....आपल्या शेतात गारांचा पाऊस नव्हता किंवा फारच कमी पडला! आता बोला!

असा हा माझा सद्गुरुराया....आपल्या भक्ताला तारणारे....माझे बापू!

सकाळी अचानक मिळालेल्या ह्या कलाटणीने आता सर्वांचीच मने हलकी झाली होती. त्यामुळे आम्ही हॅप्पी होम श्रीगुरुक्षेत्रम्ला उदी प्रसादाचाही आनंद घेऊ शकलो. बापू हे असेच आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी छायाछत्र धरून बसलेले असतात. म्हणूनच आमच्यावरचे भयानक संकट बापूरायांनी टाळले.

बापू, तुझे ऋण कसे फेडू? आमच्याकडून चांगली सेवाभक्ती करून घे हीच प्रार्थना!


॥ हरि ॐ ॥
01:26 samirsinh dattopadhye
Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan

संकट हे कोणालाच चुकले नाही. प्रारब्धानुसार ज्याला त्याला आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना हा करावाच लागतो. फरक कुठे होतो, तर जो सद्गुरुंच्या छत्रछायेखाली आहे, त्याला कुठून ना कुठून संरक्षण मिळते, संकटात अचानक कुठूनतरी मदत उभी राहते, मनाधार मिळतो, हा बहुतेक सद्गुरुभक्तांचा अनुभव आहे.
 - जीजाबराव सोनवणे, जिराळी (जळगाव)

मी २००४ मध्ये अनिरुद्धबापूंच्या सेवाकार्यात प्रथम भाग घेतला. त्यानंतर मला सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे अनेक अनुभव आले.
मला पहिला अनुभव २००८ मध्ये आला. माझी पत्नी, चार मुली व मोठा मुलगा असा माझा परिवार आहे व बापूंच्या कृपेने सुखात चालत होता. माझी दोन नंबरची मुलगी गरोदर होती. तिची प्रसूतीची तारीख दिली होती, ३० जुलै २००८. म्हणून मी माझ्या मुलीस भेटावयास २६ जुलैला जळगावमधील मु.पो. मोहाडी येथे गेलो.

योगायोगाने ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी, म्हणजे शनिवारी मुलीचे पोट दुखावयास सुरुवात झाली. त्यावेळी माझ्या मुलाने गावातील नर्सला बोलावले. तिने खूप प्रयत्न केले परंतु यश येत नव्हते. तेव्हा त्या नर्सने सांगितले की तुम्ही कुठेतरी दवाखान्यात घेऊन जा.

घरातील मंडळी घाबरली. आता बापूंशिवाय कोण आधार? म्हणून लगेच बापूंचे नामस्मरण सुरू केले. आमच्याजवळ असलेली संस्थेची उदी तिला पाण्यात टाकून पाजली व थोडी कपाळास लावली व बापूंना सांगितले की ‘बापू, तुम्हीच तुमच्या नातवाला सांभाळा!’

तोच काय चमत्कार! तेवढ्यात माझ्या मुलीला - स्वतः बापूच आमच्या घराच्या उंबरठ्याजवळ येऊन उभे राहिले आहेत असे दृश्य दिसले. मुलगी ओरडलीच, ‘‘अगं आई, बघ बापू आले’’ आणि असे म्हणत तिने बापूंचा जयजयकारही केला - ‘जय बापूराया, जय बापूराया’!

इतके होतेय तोच बापूंनी उजवा हात वर करून आशीर्वाद दिला असे तिला दिसले; आणि अक्षरशः त्यानंतर लगेचच मुलीची डिलिव्हरी झाली सुद्धा....तिला मुलगा झाला! अनुभवी नर्सलाही जी डिलिव्हरी गुंतागुंतीची (‘कॉम्प्लिकेटेड’) वाटत होती, ती माझ्या बापूंच्या कृपेने किती सुलभरित्या झाली! खरंच बापूराया, आमच्यासारख्या सर्वसामान्य भक्ताने मारलेल्या हाकेलाही धावून आलास....मी तुझे कसे ऋण फेडू?

दुसरा अनुभव असा की आम्ही जिराळी व इंधवे केंद्र मिळून १४ माणसे एकत्र खाजगी गाडी करून गुरुवार दि. १७ डिसेंबर २००९ रोजी ठीक ६ वाजता बापूंच्या प्रवचनासाठी बांद्रा न्यू इंग्लिश स्कूल येथे गेलो. त्या वेळेस बापू गुरुक्षेत्रम्मध्ये स्वतःच्या हाताने उदी देत असत. त्याकरिताही दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी आमचा नंबर लागला होता. शिवाय गुरुवारी प्रवचनस्थळी आम्हाला पुष्पवृष्टीची सेवा मिळाली होती म्हणून आम्हां सर्वांना फारच आनंद झाला होता. पण नेमके त्या दिवशी बापू काही प्रवचनास आले नाहीत. माझ्याबरोबर आलेल्यांतील काही लोकांचा धीर सुटून ते त्यावरून बापूंवर शंका घेऊन तक्रारीच्या सुरात काहीबाही बोलू लागले. त्यांचे म्हणणे होते की ‘तुम्ही म्हणता बापूंना सगळं कळतं, मग आपण एवढे लांबून एवढा खर्च करून आलो आणि बापूंनी दर्शन का नाही दिलं ?’, वगैरे वगैरे.

त्यानंतर आम्ही सद्गुरु गुणसंकीर्तनसत्संग ऐकत त्या स्कूलच्या पटांगणात बसलो असता रात्री ९ वाजता एकाच्या मोबाईलवर घरुन फोन आला की आपल्या गावामध्ये गारांचा पाऊस पडला....एवढा की संपूर्ण गावभर गारांचा दोन फुटाचा थर जमिनीवर लागला आहे. माझ्या घरूनसुद्धा फोन आला. प्रश्न होता आम्हा सर्वांच्या शेतजमिनीचा. पीकांची सर्व नासाडी झाली असणार ह्या विचाराने कोणाचेच मन त्यापुढील सत्संगात लागत नव्हते. मनात बापूंची आळवणी सुरूच होती की बापुराया, हे असे कसे झाले?

दुसर्‍या दिवशी आम्हाला गुरुक्षेत्रम् येथे बापूंच्या हस्ते उदीचा प्रसाद मिळणार होता. म्हणून आम्ही कुर्ल्याला, इंधपे येथील अनिरुद्ध उपासना केंद्राचे प्रमुख सेवक श्री. महेंद्र निंबा पाटील यांच्या बहिणीचे घर आहे, त्यांच्या घरी मुक्कामाला राहणार होतो. त्यामुळे वांद्रे येथून आम्ही कुर्ल्याला त्यांच्या घरी गेलो. बाकीची मंडळी ‘लगेच गावाला जायला निघूया’ म्हणून सांगत होती, पण ‘नशिबाने उदीप्रसादासाठी नंबर लागलाय, तो गमावू नका’ असे म्हणून कुर्ल्याच्या पाहुण्यांनी कोणासही घरी निघू दिले नाही व आमचा चांगला पाहुणचार केला.

ती रात्र तशीच गावच्या संकटाचा विचार करण्यात गेली. सकाळी उदी प्रसादाचा लाभ होता परंतु ह्या गारांच्या पावसाने आमच्या शेतांचे किती नुकसान झाले असेल ह्या विचाराने आमचे कोणाचेच चित्त लागत नव्हते.

शेवटी बापूलाच दया आली बहुतेक....सकाळी ७ वाजता माझ्या घरून मुलाचा फोन आला की आपल्या शेताचं विशेष नुकसान झालेलं नाही, आपल्या शेतात गारांचा पाऊस फारच कमी होता. माझा जीव भांड्यात पडला व मी उलटसुलट विचार करून सद्गुरुंना त्रास दिल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली.

आश्‍चर्य म्हणजे हे इतक्यावरच थांबले नाही, तर आम्ही जेवढे चौदाजण तिथे आलो होतो, त्यांतल्या प्रत्येकाच्याच घरून आता फोन येऊ लागले की आपलं शेत सुखरूप आहे....आपल्या शेतात गारांचा पाऊस नव्हता किंवा फारच कमी पडला! आता बोला!

असा हा माझा सद्गुरुराया....आपल्या भक्ताला तारणारे....माझे बापू!

सकाळी अचानक मिळालेल्या ह्या कलाटणीने आता सर्वांचीच मने हलकी झाली होती. त्यामुळे आम्ही हॅप्पी होम श्रीगुरुक्षेत्रम्ला उदी प्रसादाचाही आनंद घेऊ शकलो. बापू हे असेच आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी छायाछत्र धरून बसलेले असतात. म्हणूनच आमच्यावरचे भयानक संकट बापूरायांनी टाळले.

बापू, तुझे ऋण कसे फेडू? आमच्याकडून चांगली सेवाभक्ती करून घे हीच प्रार्थना!


॥ हरि ॐ ॥

Saturday 2 September 2017

Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan-Jalgaon

ऑपरेशन म्हटलं की सर्वसामान्य माणसाला भीती वाटतेच. त्यात पुन्हा डॉक्टरांनीही ऑपरेशनबद्दल भीती दाखवली तर मग भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. मात्र ह्या अनुभव लिहिणार्‍या श्रद्धावानाने म्हटल्याप्रमाणे ‘विश्वाचा डॉक्टर’ असणार्‍या सद्गुरुंचा वरदहस्त असल्यावर कुठलीच भीती आपल्या मनाचा ताबा घेत नाही हे निश्चित !
- केवलसिंह रजपूत, जळगाव

 
मला माझे मामेभाऊ राजेंद्रसिंह पाटील, धुळे यांच्याकडून दि.१०.७.२००१ रोजी बापूंबद्दल माहिती मिळाली. अर्थात ही सद्गुरुंचीच योजना असल्यामुळे मनात कोणताही कुतर्क, शंका, कुशंका न येता मी व माझा परिवार उपासना केंद्रावर जायला लागलो.

साईबाबांनी म्हटल्याप्रमाणे ‘माझा माणूस कुठेही असो, त्याच्या पायाला दोर बांधून मी खेचून आणतो’. आमच्या बाबतीतही तसेच झाले. बापूंच्या कृपेने थोडी फार भक्ती व सेवा करत आम्ही पूर्ण बापूमय झालो.

परंतु कर्माच्या अटळ सिद्धांताप्रमाणे प्रारब्ध भोग भोगावेच लागतात हेही खरे आणि सद्गुरु मनःसामर्थ्य देवून कठिण प्रारब्ध सौम्य करतात हेही तितकेच खरे. फक्त आपला ‘विश्वास’ असावा लागतो याबद्दलचा हा माझा अनुभव.

मी दि.१-१०-२०११ रोजी काविळ व मधुमेहामुळे आजारी झालो. त्यामुळे अंमळनेर येथील स्थानिक दवाखान्यात दाखल झालो. ८-९ दिवस उपचार करुन काविळ थोडी कमी झाली. परंतु नंतर परत काविळ उलटली आणि सर्व उपाय करुनही कमी न झाल्यामुळे, आमचे आश्रयस्थान प.पू. सुचितदादा ह्यांच्याशी संपर्क करायचा ठरवला. डॉ.संजीवसिंह चव्हाण यांनी फोन करुन अपॉइंटमेंट घेतली व त्यांनी स्वतः मला २९-११-२०११ ला प.पू. दादांशी भेट घालून दिली.

प.पू. दादांनी फाईल पाहून डॉ.लिनम पडेलकरांना डॉ.वाडीयार यांच्याशी संपर्क करायला लावला. त्याप्रमाणे डॉ.वाडियार यांनी मला तपासून एमआरआय व अ‍ॅडव्हान्स इन्डोस्कोपि करुन घेतली. तपासांती २०/१/२०१२ पर्यंत लिव्हरचे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले व तेही चेन्नई येथे.

हे ऐकून माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भिती निर्माण झाली नाही. कारण एकच, ‘एक विश्वास असावा पुरता...’. त्याप्रमाणे २०/१/२०१२ ला चेन्नईला अ‍ॅडमिट झालो. तेथील स्थानिक डॉक्टरांनी बरीचशी भितीदायक माहिती सांगितली. ‘८-९ तासांचे ऑपरेशन आहे, वयाच्या मानाने कठिणच आहे’, वगैरे वगैरे माहिती ते देत होते. परंतु प.पू. दादांनी मला तीन वेळा अनिरुद्ध चलिसा म्हणण्यास सांगितले होते. अनिरुद्ध चलिसा व त्यासोबत असणारा माझा दृढ विश्वास ह्यामुळे मी सकाळी आनंदात ऑपरेशनसाठी गेलो.

ऑपरेशन एकदम यशस्वी झाले. एवढेच नाही तर सद्गुरुंच्या कृपेने, मी वयस्कर असूनही, माझ्या शरीराने खूप छान साथ दिली व मी लवकर बरा झालो. ज्या डॉक्टरांनी मला आधी भीती दाखवली होती, ते तीन दिवसांनी मला भेटले व म्हणाले, ‘‘सॉरी. मी तुम्हाला जरा जास्तच भितीदायक सांगितले. तसे काहीही झाले नाहीच पण तुमची रिकव्हरी पाहता हा मला चमत्कारच वाटतो.’’ मला मात्र खात्री होती की माझा ‘विश्वाचा डॉक्टर’ तिथे असल्यामुळे हे सर्व घडले होते आणि म्हणूनच मला कसलीच भिती जाणवली नव्हती.

याप्रमाणे प्रारब्धभोग हलके करुन बापूंनी दुर्गमतेकडून मला सुगमतेकडे नेले.

बापूराया, माझी अल्प भक्ती असतांना, तू माझ्यासाठी एवढे केलेस ! ह्या तुझ्या लाभेवीण प्रेमाबद्दल मी तुझा खूप ऋणी आहे. बापूराया, जन्मोजन्मी मी असाच तुझ्या चरणांशी असू दे हेच माझे मागणे आहे.

॥ हरि ॐ ॥
05:02 samirsinh dattopadhye
Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan-Jalgaon

ऑपरेशन म्हटलं की सर्वसामान्य माणसाला भीती वाटतेच. त्यात पुन्हा डॉक्टरांनीही ऑपरेशनबद्दल भीती दाखवली तर मग भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. मात्र ह्या अनुभव लिहिणार्‍या श्रद्धावानाने म्हटल्याप्रमाणे ‘विश्वाचा डॉक्टर’ असणार्‍या सद्गुरुंचा वरदहस्त असल्यावर कुठलीच भीती आपल्या मनाचा ताबा घेत नाही हे निश्चित !
- केवलसिंह रजपूत, जळगाव

 
मला माझे मामेभाऊ राजेंद्रसिंह पाटील, धुळे यांच्याकडून दि.१०.७.२००१ रोजी बापूंबद्दल माहिती मिळाली. अर्थात ही सद्गुरुंचीच योजना असल्यामुळे मनात कोणताही कुतर्क, शंका, कुशंका न येता मी व माझा परिवार उपासना केंद्रावर जायला लागलो.

साईबाबांनी म्हटल्याप्रमाणे ‘माझा माणूस कुठेही असो, त्याच्या पायाला दोर बांधून मी खेचून आणतो’. आमच्या बाबतीतही तसेच झाले. बापूंच्या कृपेने थोडी फार भक्ती व सेवा करत आम्ही पूर्ण बापूमय झालो.

परंतु कर्माच्या अटळ सिद्धांताप्रमाणे प्रारब्ध भोग भोगावेच लागतात हेही खरे आणि सद्गुरु मनःसामर्थ्य देवून कठिण प्रारब्ध सौम्य करतात हेही तितकेच खरे. फक्त आपला ‘विश्वास’ असावा लागतो याबद्दलचा हा माझा अनुभव.

मी दि.१-१०-२०११ रोजी काविळ व मधुमेहामुळे आजारी झालो. त्यामुळे अंमळनेर येथील स्थानिक दवाखान्यात दाखल झालो. ८-९ दिवस उपचार करुन काविळ थोडी कमी झाली. परंतु नंतर परत काविळ उलटली आणि सर्व उपाय करुनही कमी न झाल्यामुळे, आमचे आश्रयस्थान प.पू. सुचितदादा ह्यांच्याशी संपर्क करायचा ठरवला. डॉ.संजीवसिंह चव्हाण यांनी फोन करुन अपॉइंटमेंट घेतली व त्यांनी स्वतः मला २९-११-२०११ ला प.पू. दादांशी भेट घालून दिली.

प.पू. दादांनी फाईल पाहून डॉ.लिनम पडेलकरांना डॉ.वाडीयार यांच्याशी संपर्क करायला लावला. त्याप्रमाणे डॉ.वाडियार यांनी मला तपासून एमआरआय व अ‍ॅडव्हान्स इन्डोस्कोपि करुन घेतली. तपासांती २०/१/२०१२ पर्यंत लिव्हरचे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले व तेही चेन्नई येथे.

हे ऐकून माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भिती निर्माण झाली नाही. कारण एकच, ‘एक विश्वास असावा पुरता...’. त्याप्रमाणे २०/१/२०१२ ला चेन्नईला अ‍ॅडमिट झालो. तेथील स्थानिक डॉक्टरांनी बरीचशी भितीदायक माहिती सांगितली. ‘८-९ तासांचे ऑपरेशन आहे, वयाच्या मानाने कठिणच आहे’, वगैरे वगैरे माहिती ते देत होते. परंतु प.पू. दादांनी मला तीन वेळा अनिरुद्ध चलिसा म्हणण्यास सांगितले होते. अनिरुद्ध चलिसा व त्यासोबत असणारा माझा दृढ विश्वास ह्यामुळे मी सकाळी आनंदात ऑपरेशनसाठी गेलो.

ऑपरेशन एकदम यशस्वी झाले. एवढेच नाही तर सद्गुरुंच्या कृपेने, मी वयस्कर असूनही, माझ्या शरीराने खूप छान साथ दिली व मी लवकर बरा झालो. ज्या डॉक्टरांनी मला आधी भीती दाखवली होती, ते तीन दिवसांनी मला भेटले व म्हणाले, ‘‘सॉरी. मी तुम्हाला जरा जास्तच भितीदायक सांगितले. तसे काहीही झाले नाहीच पण तुमची रिकव्हरी पाहता हा मला चमत्कारच वाटतो.’’ मला मात्र खात्री होती की माझा ‘विश्वाचा डॉक्टर’ तिथे असल्यामुळे हे सर्व घडले होते आणि म्हणूनच मला कसलीच भिती जाणवली नव्हती.

याप्रमाणे प्रारब्धभोग हलके करुन बापूंनी दुर्गमतेकडून मला सुगमतेकडे नेले.

बापूराया, माझी अल्प भक्ती असतांना, तू माझ्यासाठी एवढे केलेस ! ह्या तुझ्या लाभेवीण प्रेमाबद्दल मी तुझा खूप ऋणी आहे. बापूराया, जन्मोजन्मी मी असाच तुझ्या चरणांशी असू दे हेच माझे मागणे आहे.

॥ हरि ॐ ॥

Monday 28 August 2017

Anubhav-kathan-Aniruddhabapu-Jalgaon
सुभाषसिंह भारतिया, जळगाव  यांना आलेला बापूंचा अनुभव 


खोल नदीवरील अरुंद पुलावरून मोटरसायकलवरून चाललेला श्रद्धावान व मागून सुसाट वेगाने येणारी गाडी....ह्या गाड्यांमधील अंतर झपाट्याने कमी कमी होत आता फक्त पाच फुटांवर आले आहे. जीवन व मरण ह्यांमधील अंतर केवळ पाच फूट....पण हे अंतर सद्गुरुंच्या छत्रछायेखाली असणार्‍या श्रद्धावानाला ‘जीवना’च्या दिशेने खेचण्यास पुरेसे असते!
- सुभाषसिंह भारतिया, जळगाव 

माझा बापू माझ्यासाठी धावत येतोच, नव्हे तर तो सदैव माझ्याबरोबरच असतो. माझा बापू सोबतीला माझ्या बरोबरच आहे ह्याचे अनुभव मला पदोपदी येत आहेत. मला १९९८ अगोदर एकंदर ७ असे मोठे अपघात झाले परंतु सुदैवाने परमेश्वरी कृपेने काही एक झाले नाही. मी नेहमी बचावलो. मला काहीही झाले नाही. २००१ पासून मी अनिरुद्ध उपासना केंद्र-जळगाव येथे दर शनिवारी बापूंच्या उपासनेकरिता जाऊ लागलो. तेव्हांपासून माझ्या जीवनात फक्त बापूच; दुसरा कोणीही नाही. मी बापूंना फक्त एवढेच सांगतो, बापू मला सांभाळून घ्या, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही.

सन २००६ ची गोष्ट. मी त्यावेळी औषध कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून पाच जिल्ह्यांमध्ये काम करीत होतो. माझा मुक्काम औरंगाबाद येथे होता व तेथून आम्हाला माझ्या सहकार्‍याबरोबर (रिप्रेझेंटेटीवबरोबर) जालन्याला कामाला जायचे होते. सकाळीच माझा रिप्रेझेंटेटीव सचिन मोटरसायकल घेऊन मला घ्यायला आला व म्हणाला, ‘‘साहेब, मोटरसायकलवर जाऊन येऊ जालन्याला.’’ मी म्हणालो, ‘‘कशाला रिस्क घेतोस? आपण बसने जाऊन येऊ.’’ परंतु त्याच्या विनंतीला मी काही नाकारू शकलो नाही व आम्ही पेट्रोल भरून ४५ च्या स्पीडने हळूहळू बोलत बोलत निघालो.

मी रस्त्यात त्याला बापूंविषयीच्या गोष्टी ऐकवत होतो. केंद्रात बापूंच्या ज्या प्रवचनाची सीडी ऐकली त्याचा थोडासा सारांश वगैरे वगैरे ऐकवला.

बोलण्याबोलण्यात आम्ही ३ कि.मी. अंतर केव्हा पार केले ते कळलेच नाही. ह्या ठिकाणी एक वळण होते व एक नदी लागली. नदीच्या पुलावरून आम्ही जाऊ लागलो. आमच्या पुढे एक बैलगाडी व त्याच्या पुढे एक ट्रॅक्टर असे हळूहळू जात होते. पुल जास्त रुंद नव्हता, त्यामुळे ओव्हरटेक न करता हळूहळू मागून जाणंच आम्ही पसंत केलं. 

आम्ही पुलाच्या मध्येपर्यंत पोहोचत नाही, तेवढ्यात मागून रस्ता मोकळा असल्यामुळे एक रिकामी अ‍ॅम्बॅसेडर इतक्या वेगाने वळणावर आली की ती आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल असेच आम्हाला वाटले. अर्थात आमची बाईक असल्याने आम्हाला त्या गाडीच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केले तरी पुलाच्या अपुर्‍या रुंदीमुळे पुढील बैलगाडी व ट्रॅक्टर ह्यांना ओव्हरटेक करणे त्याला जमले असते की नाही देव जाणे. आमच्यातील अंतर कमी होत होत आता आमच्यापासून ती गाडी फक्त ५ फुटांवर आली. 

आता आम्हाला वाटले की ती आम्हाला ओव्हरटेक करणार, तेवढ्यात एकदम जोराचा आवाज झाला आणि त्याची गाडी खाडकन जागीच बंद पडली. त्या विचित्र भयंकर आवाजाने आम्ही खूपच घाबरलो. कसला आवाज झाला म्हणून मागे वळून पाहिले तर त्या बंद पडलेल्या गाडीचा ड्रायव्हर घाबरून बाहेर येऊन पाहत होता की नक्की त्याच्या गाडीला काय झाले? 

तोही खूप घाबरला होता कारण एक भयानक अपघात होता होता टळला होता. त्याचवेळेस सचिन ओरडला, ‘‘साहेब तुमच्याबरोबर बापू होते म्हणून आपण वाचलो; नाहीतर आज सरळ आपण मोटरसायकलसकट पुलावरून खोल नदीत पडलो असतो. आपले काय झाले असते देवच जाणे.’’  

कदाचित आम्ही दोघेही वाचलोच नसतो. मी कुठेही गेलो तरी माझ्या वरच्या खिशामध्ये आपल्या संस्थेची उदी असलेले व बापूंचा फोटो असलेले पेन नेहमी असते. माझा बापू माझ्या सोबत असल्याची जाणीव मला त्यामुळे कायम जागृत राहते. श्रद्धावानांचे सुरक्षाकवच असणार्‍या त्या माझ्या बापूनेच बसल्या जागी काहीतरी चक्रं फिरवली आणि आमच्यावर वेगाने आदळण्याच्या बेतात असलेली ती गाडी जागीच बंद पाडली.

पुढे मी रिटायर व्हायच्या एक वर्ष आधीच कंपनी सोडली व आता जळगाव येथे वकील म्हणून प्रॅक्टीस करतो. माझा बापू सदैव माझ्या बरोबर आहे....नेहमीच असतो व मला ह्या वयातही चैतन्यमय ठेवतो, हे मला रोजच्या रोज अनुभवास येते. माझे सहकारी आजही मला सांगतात की ‘तू कुठून एवढी एनर्जी आणतोस? इतक्या उत्साहाने कुठलेही काम कसे काय करतोस?’ बस्स! त्यांना मला एवढेच म्हणायचे आहे की माझा बापू माझ्याबरोबर सदैव राहतो व तोच माझ्याकडून चांगली कामे करवून घेतो व माझ्यातल्या ऊर्जेचाही तोच स्रोत आहे. ही बापूंचीच माझ्यावर कृपा !!

॥ हरि ॐ ॥
01:28 samirsinh dattopadhye
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Jalgaon
सुभाषसिंह भारतिया, जळगाव  यांना आलेला बापूंचा अनुभव 


खोल नदीवरील अरुंद पुलावरून मोटरसायकलवरून चाललेला श्रद्धावान व मागून सुसाट वेगाने येणारी गाडी....ह्या गाड्यांमधील अंतर झपाट्याने कमी कमी होत आता फक्त पाच फुटांवर आले आहे. जीवन व मरण ह्यांमधील अंतर केवळ पाच फूट....पण हे अंतर सद्गुरुंच्या छत्रछायेखाली असणार्‍या श्रद्धावानाला ‘जीवना’च्या दिशेने खेचण्यास पुरेसे असते!
- सुभाषसिंह भारतिया, जळगाव 

माझा बापू माझ्यासाठी धावत येतोच, नव्हे तर तो सदैव माझ्याबरोबरच असतो. माझा बापू सोबतीला माझ्या बरोबरच आहे ह्याचे अनुभव मला पदोपदी येत आहेत. मला १९९८ अगोदर एकंदर ७ असे मोठे अपघात झाले परंतु सुदैवाने परमेश्वरी कृपेने काही एक झाले नाही. मी नेहमी बचावलो. मला काहीही झाले नाही. २००१ पासून मी अनिरुद्ध उपासना केंद्र-जळगाव येथे दर शनिवारी बापूंच्या उपासनेकरिता जाऊ लागलो. तेव्हांपासून माझ्या जीवनात फक्त बापूच; दुसरा कोणीही नाही. मी बापूंना फक्त एवढेच सांगतो, बापू मला सांभाळून घ्या, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही.

सन २००६ ची गोष्ट. मी त्यावेळी औषध कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून पाच जिल्ह्यांमध्ये काम करीत होतो. माझा मुक्काम औरंगाबाद येथे होता व तेथून आम्हाला माझ्या सहकार्‍याबरोबर (रिप्रेझेंटेटीवबरोबर) जालन्याला कामाला जायचे होते. सकाळीच माझा रिप्रेझेंटेटीव सचिन मोटरसायकल घेऊन मला घ्यायला आला व म्हणाला, ‘‘साहेब, मोटरसायकलवर जाऊन येऊ जालन्याला.’’ मी म्हणालो, ‘‘कशाला रिस्क घेतोस? आपण बसने जाऊन येऊ.’’ परंतु त्याच्या विनंतीला मी काही नाकारू शकलो नाही व आम्ही पेट्रोल भरून ४५ च्या स्पीडने हळूहळू बोलत बोलत निघालो.

मी रस्त्यात त्याला बापूंविषयीच्या गोष्टी ऐकवत होतो. केंद्रात बापूंच्या ज्या प्रवचनाची सीडी ऐकली त्याचा थोडासा सारांश वगैरे वगैरे ऐकवला.

बोलण्याबोलण्यात आम्ही ३ कि.मी. अंतर केव्हा पार केले ते कळलेच नाही. ह्या ठिकाणी एक वळण होते व एक नदी लागली. नदीच्या पुलावरून आम्ही जाऊ लागलो. आमच्या पुढे एक बैलगाडी व त्याच्या पुढे एक ट्रॅक्टर असे हळूहळू जात होते. पुल जास्त रुंद नव्हता, त्यामुळे ओव्हरटेक न करता हळूहळू मागून जाणंच आम्ही पसंत केलं. 

आम्ही पुलाच्या मध्येपर्यंत पोहोचत नाही, तेवढ्यात मागून रस्ता मोकळा असल्यामुळे एक रिकामी अ‍ॅम्बॅसेडर इतक्या वेगाने वळणावर आली की ती आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल असेच आम्हाला वाटले. अर्थात आमची बाईक असल्याने आम्हाला त्या गाडीच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केले तरी पुलाच्या अपुर्‍या रुंदीमुळे पुढील बैलगाडी व ट्रॅक्टर ह्यांना ओव्हरटेक करणे त्याला जमले असते की नाही देव जाणे. आमच्यातील अंतर कमी होत होत आता आमच्यापासून ती गाडी फक्त ५ फुटांवर आली. 

आता आम्हाला वाटले की ती आम्हाला ओव्हरटेक करणार, तेवढ्यात एकदम जोराचा आवाज झाला आणि त्याची गाडी खाडकन जागीच बंद पडली. त्या विचित्र भयंकर आवाजाने आम्ही खूपच घाबरलो. कसला आवाज झाला म्हणून मागे वळून पाहिले तर त्या बंद पडलेल्या गाडीचा ड्रायव्हर घाबरून बाहेर येऊन पाहत होता की नक्की त्याच्या गाडीला काय झाले? 

तोही खूप घाबरला होता कारण एक भयानक अपघात होता होता टळला होता. त्याचवेळेस सचिन ओरडला, ‘‘साहेब तुमच्याबरोबर बापू होते म्हणून आपण वाचलो; नाहीतर आज सरळ आपण मोटरसायकलसकट पुलावरून खोल नदीत पडलो असतो. आपले काय झाले असते देवच जाणे.’’  

कदाचित आम्ही दोघेही वाचलोच नसतो. मी कुठेही गेलो तरी माझ्या वरच्या खिशामध्ये आपल्या संस्थेची उदी असलेले व बापूंचा फोटो असलेले पेन नेहमी असते. माझा बापू माझ्या सोबत असल्याची जाणीव मला त्यामुळे कायम जागृत राहते. श्रद्धावानांचे सुरक्षाकवच असणार्‍या त्या माझ्या बापूनेच बसल्या जागी काहीतरी चक्रं फिरवली आणि आमच्यावर वेगाने आदळण्याच्या बेतात असलेली ती गाडी जागीच बंद पाडली.

पुढे मी रिटायर व्हायच्या एक वर्ष आधीच कंपनी सोडली व आता जळगाव येथे वकील म्हणून प्रॅक्टीस करतो. माझा बापू सदैव माझ्या बरोबर आहे....नेहमीच असतो व मला ह्या वयातही चैतन्यमय ठेवतो, हे मला रोजच्या रोज अनुभवास येते. माझे सहकारी आजही मला सांगतात की ‘तू कुठून एवढी एनर्जी आणतोस? इतक्या उत्साहाने कुठलेही काम कसे काय करतोस?’ बस्स! त्यांना मला एवढेच म्हणायचे आहे की माझा बापू माझ्याबरोबर सदैव राहतो व तोच माझ्याकडून चांगली कामे करवून घेतो व माझ्यातल्या ऊर्जेचाही तोच स्रोत आहे. ही बापूंचीच माझ्यावर कृपा !!

॥ हरि ॐ ॥

Thursday 24 August 2017

Anubhav Kathan Aniruddha Bapu - Jalgaon

आर्थिक परिस्थिती बेताची...त्यात अचानक घरात पडल्याचे निमित्त होऊन निर्माण झालेले दुखणे अगदी हाडाचा कॅन्सर व टी.बी. होण्याकडे झुकते...आणि सर्वकाही गमावल्याची भावना मनात उमटते. पण जिथे अंधार असतो तिथे बापू आशेचा किरण घेऊन स्वत: उभा असतो. दृढ विश्‍वास आणि गुरुक्षेत्रम्ची उदी आपला प्रभाव दाखवतेच आणि पुन्हा रिपोर्ट  काढल्यावर फक्त टी.बी.वर निभावते. प्रारब्धाचे बीज बापूच्या चरणी अर्पण करूनी धन्य व्हावे...
- पंकजसिंह माळी, जळगांव

मी पंकजसिंह माळी. मला व माझ्या कुटुंबियांना प्रारब्धानुसार जे जे उचित आहे ते माझ्या बापूंनी वेळोवेळी दिले. त्यातील सर्वात जबरदस्त अनुभव मी आपल्या समोर मांडत आहे.

माझा भाऊ रविंद्र हा फेब्रुवारी २०१२ मध्ये घरात जमिनीवर सांडलेल्या चहावरून घसरून खाली पडला. मुका मार चांगलाच लागला, पण त्याकडे दुर्लक्ष करून मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला गेला. तिथून आल्यानंतर त्याचा पाय आणि कंबर दुखण्यास सुरुवात झाली.

आम्ही त्याच्यावर भुसावळ येथील ऑर्थो-सर्जनच्या वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार केला. परंतु त्रास कमी न होता वाढतच होता. २ महिने असेच गेले. त्यानंतर उपासना केंद्रात चर्चा झाल्यावर केंद्रातील एका बापूभक्ताने मला जळगांव येथील एका डॉक्टरकडे जाण्यासंबंधी सुचविले. त्याप्रमाणे मी त्याला २ मे ला त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सुचविल्यानुसार भावाचा एम.आर.आय आणि इतर रक्ताच्या टेस्ट केल्या. त्याचा रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले की पाठीचे काही मणके काळे पडले असून खराब व निकामी झाले आहेत.

मग डॉक्टरांनी त्याच्या मणक्याच्या हाडाचा तुकडा घेऊन तो तपासणीसाठी मुंबईला पाठविला. त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले की त्याला हाडाचा कॅन्सर किंवा टी.बी असण्याची शक्यता आहे; आपण रिपोर्ट येण्याची वाट पाहू.

आम्ही परमपूज्य बापूंची आराधना करण्यास सुरूवात केली. कारण माझा भाऊ कुठल्याच आजारास आर्थिक परिस्थितीमुळे तोंड देऊ शकत नव्हता. त्यास ३ व ५ वर्षाची अशी दोन लहान मुलं आहेत. तो हातमजुरी करून आपला चरितार्थ चालवत असे.

मुंबईहून रिपोर्ट आला. त्यात कॅन्सर व हाडाचा टी. बी. असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी टी.बी. ची ट्रीटमेंट सुरू केली. परंतु ५/६ दिवसांनी त्याला जास्त त्रास सुरू झाला. तिथे मुंबईतील एक कॅन्सरतज्ञ डॉ.बढे आले होते. त्यांच्याशी डॉक्टरांनी चर्चा केली.

मी बापूंचा धावा करत होतो - ‘हे सद्‌गुरुराया, यातून तुला जे योग्य वाटेल तो निर्णय तू मला दे.’

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी भावास २४ मे ला मुंबईला पॅड स्कॅनिंगसाठी घेऊन गेलो. दुसर्‍या दिवशी पॅड स्कॅनिंग केले. त्याचा रिपोर्ट बघून डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले व तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, तेदेखील समजावून सांगितले.

हे ऐकून मी खचून गेलो. पण मी बापूंचा धावा करणे काही सोडले नाही. तसाच बहिणीकडे बापूंच्या उपासनेला बसलो. डॉक्टरांनी मणक्याची बायोप्सी करण्यासाठी २८ तारखेला सकाळी बोलावले. बायोप्सीचा रिपोर्ट येण्यास ५/६ दिवस लागले. या दिवसात भावाला रोज सकाळ-संध्याकाळ संस्थेची उदी देत होतो कारण आता तो अनिरुद्धच आमचा त्राता होता.

२ जून रोजी बायोप्सीचे रिपोर्ट मिळाले. तेव्हा आमच्या अनिरुद्ध उपासना केंद्रातील एक सह-श्रद्धावान रमेशसिंह सपकाळ यांनी मला हॅप्पी होमला जाऊन डॉ. सुचितदादांना रिपोर्ट दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी हॅपी होमला आलो परंतु क्लिनिकची वेळ होऊन गेली असल्यामुळे सुचितदादांना भेटता आले नाही. हताश होऊन मी श्री गुरुक्षेत्रम् मधून संस्थेची उदी घेऊन निघालो. पण माझ्या मनात ठाम विश्‍वास होता की बापू आमच्या पाठीशी आहेत आणि तेच ह्यातून काहीतरी मार्ग काढतील.

तेवढ्यात मला काय वाटले कोण जाणे, मी पूर्वी आमच्या डॉक्टरांकडे भेट झालेल्या डॉ. बढे यांना फोन केला व त्यांची भेटण्याची वेळ घेऊन त्यांना रिपोर्ट दाखवला. रिपोर्ट पाहताच त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कारण रिपोर्ट मध्ये भावाला झालेला रोग हा कॅन्सर नसून हाडाचा टी.बी. असल्याचे निष्पन्न झाले होते.

डॉक्टरांचे शब्द ऐकताना माझ्या मनातील आनंद ओसंडून वाहत होता व डॉक्टरांच्या मुखातून बापूच बोलताहेत असे मला वाटू लागले. भावाला जीवघेणा कॅन्सर झालेला नसल्याचे निष्पन्न होणे, तिथेच अर्धी लढाई बापूंनी जिंकून दिली होती. आता राहिला हाडाचा टी.बी., तो बरा होऊ शकणारा रोग होता.

बापूंच्या कृपेमुळे कॅन्सर ऐवजी टी.बी. वर निभावले. माझ्या बापूरायाने माझ्या भावाला असाध्य रोगातून वाचवून त्याऐवजी बरा होऊ शकणारा आजार दिला.

॥ हरि ॐ ॥
02:18 samirsinh dattopadhye
Anubhav Kathan Aniruddha Bapu - Jalgaon

आर्थिक परिस्थिती बेताची...त्यात अचानक घरात पडल्याचे निमित्त होऊन निर्माण झालेले दुखणे अगदी हाडाचा कॅन्सर व टी.बी. होण्याकडे झुकते...आणि सर्वकाही गमावल्याची भावना मनात उमटते. पण जिथे अंधार असतो तिथे बापू आशेचा किरण घेऊन स्वत: उभा असतो. दृढ विश्‍वास आणि गुरुक्षेत्रम्ची उदी आपला प्रभाव दाखवतेच आणि पुन्हा रिपोर्ट  काढल्यावर फक्त टी.बी.वर निभावते. प्रारब्धाचे बीज बापूच्या चरणी अर्पण करूनी धन्य व्हावे...
- पंकजसिंह माळी, जळगांव

मी पंकजसिंह माळी. मला व माझ्या कुटुंबियांना प्रारब्धानुसार जे जे उचित आहे ते माझ्या बापूंनी वेळोवेळी दिले. त्यातील सर्वात जबरदस्त अनुभव मी आपल्या समोर मांडत आहे.

माझा भाऊ रविंद्र हा फेब्रुवारी २०१२ मध्ये घरात जमिनीवर सांडलेल्या चहावरून घसरून खाली पडला. मुका मार चांगलाच लागला, पण त्याकडे दुर्लक्ष करून मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला गेला. तिथून आल्यानंतर त्याचा पाय आणि कंबर दुखण्यास सुरुवात झाली.

आम्ही त्याच्यावर भुसावळ येथील ऑर्थो-सर्जनच्या वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार केला. परंतु त्रास कमी न होता वाढतच होता. २ महिने असेच गेले. त्यानंतर उपासना केंद्रात चर्चा झाल्यावर केंद्रातील एका बापूभक्ताने मला जळगांव येथील एका डॉक्टरकडे जाण्यासंबंधी सुचविले. त्याप्रमाणे मी त्याला २ मे ला त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सुचविल्यानुसार भावाचा एम.आर.आय आणि इतर रक्ताच्या टेस्ट केल्या. त्याचा रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले की पाठीचे काही मणके काळे पडले असून खराब व निकामी झाले आहेत.

मग डॉक्टरांनी त्याच्या मणक्याच्या हाडाचा तुकडा घेऊन तो तपासणीसाठी मुंबईला पाठविला. त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले की त्याला हाडाचा कॅन्सर किंवा टी.बी असण्याची शक्यता आहे; आपण रिपोर्ट येण्याची वाट पाहू.

आम्ही परमपूज्य बापूंची आराधना करण्यास सुरूवात केली. कारण माझा भाऊ कुठल्याच आजारास आर्थिक परिस्थितीमुळे तोंड देऊ शकत नव्हता. त्यास ३ व ५ वर्षाची अशी दोन लहान मुलं आहेत. तो हातमजुरी करून आपला चरितार्थ चालवत असे.

मुंबईहून रिपोर्ट आला. त्यात कॅन्सर व हाडाचा टी. बी. असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी टी.बी. ची ट्रीटमेंट सुरू केली. परंतु ५/६ दिवसांनी त्याला जास्त त्रास सुरू झाला. तिथे मुंबईतील एक कॅन्सरतज्ञ डॉ.बढे आले होते. त्यांच्याशी डॉक्टरांनी चर्चा केली.

मी बापूंचा धावा करत होतो - ‘हे सद्‌गुरुराया, यातून तुला जे योग्य वाटेल तो निर्णय तू मला दे.’

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी भावास २४ मे ला मुंबईला पॅड स्कॅनिंगसाठी घेऊन गेलो. दुसर्‍या दिवशी पॅड स्कॅनिंग केले. त्याचा रिपोर्ट बघून डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले व तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, तेदेखील समजावून सांगितले.

हे ऐकून मी खचून गेलो. पण मी बापूंचा धावा करणे काही सोडले नाही. तसाच बहिणीकडे बापूंच्या उपासनेला बसलो. डॉक्टरांनी मणक्याची बायोप्सी करण्यासाठी २८ तारखेला सकाळी बोलावले. बायोप्सीचा रिपोर्ट येण्यास ५/६ दिवस लागले. या दिवसात भावाला रोज सकाळ-संध्याकाळ संस्थेची उदी देत होतो कारण आता तो अनिरुद्धच आमचा त्राता होता.

२ जून रोजी बायोप्सीचे रिपोर्ट मिळाले. तेव्हा आमच्या अनिरुद्ध उपासना केंद्रातील एक सह-श्रद्धावान रमेशसिंह सपकाळ यांनी मला हॅप्पी होमला जाऊन डॉ. सुचितदादांना रिपोर्ट दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी हॅपी होमला आलो परंतु क्लिनिकची वेळ होऊन गेली असल्यामुळे सुचितदादांना भेटता आले नाही. हताश होऊन मी श्री गुरुक्षेत्रम् मधून संस्थेची उदी घेऊन निघालो. पण माझ्या मनात ठाम विश्‍वास होता की बापू आमच्या पाठीशी आहेत आणि तेच ह्यातून काहीतरी मार्ग काढतील.

तेवढ्यात मला काय वाटले कोण जाणे, मी पूर्वी आमच्या डॉक्टरांकडे भेट झालेल्या डॉ. बढे यांना फोन केला व त्यांची भेटण्याची वेळ घेऊन त्यांना रिपोर्ट दाखवला. रिपोर्ट पाहताच त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कारण रिपोर्ट मध्ये भावाला झालेला रोग हा कॅन्सर नसून हाडाचा टी.बी. असल्याचे निष्पन्न झाले होते.

डॉक्टरांचे शब्द ऐकताना माझ्या मनातील आनंद ओसंडून वाहत होता व डॉक्टरांच्या मुखातून बापूच बोलताहेत असे मला वाटू लागले. भावाला जीवघेणा कॅन्सर झालेला नसल्याचे निष्पन्न होणे, तिथेच अर्धी लढाई बापूंनी जिंकून दिली होती. आता राहिला हाडाचा टी.बी., तो बरा होऊ शकणारा रोग होता.

बापूंच्या कृपेमुळे कॅन्सर ऐवजी टी.बी. वर निभावले. माझ्या बापूरायाने माझ्या भावाला असाध्य रोगातून वाचवून त्याऐवजी बरा होऊ शकणारा आजार दिला.

॥ हरि ॐ ॥

Saturday 28 June 2014


Aniruddha Bapu Anubhav - Jalgaon

 - सुनंदावीरा बर्‍हाटे, जळगाव

बाहेरगावच्या श्रद्धावानांसाठी ‘बापू आमच्या गावी येणार’ म्हणजे तो आनंदोत्सवच असतो. मग अशा ह्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी तेथील प्रत्येक श्रद्धावान आसुसलेला असतो. अशावेळी एखाद्या श्रद्धावानाच्या जीवनात अचानक एखादी घटना घडते आणि त्याला वाटते की आपण ह्या आनंदोत्सवाला मुकणार की काय ? पण ती सद्गुरु माऊली असं होऊ देत नाही...

परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!
आम्ही बापूंच्या उपासनेत गेल्या दहा वर्षांपासून येत आहोत आणि खूप आनंद मिळवीत आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला बापूंचे खूप लहानमोठे अनुभव आलेले आहेत. दिनांक १६ ऑक्टोबर २०११ हा आपल्या जळगावच्या अनिरुद्ध उपासना केंद्राचा आनंदोत्सवाचा दिवस होता. ह्या दिवशी बापू जळगावला येणार होते. येथील सर्वच बापूभक्त खूप उत्साही आणि आनंदी होते.

दिनांक १० ऑक्टोबरला मला माझ्या नणंदेच्या शेताच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी यावल ह्या गावी जावे लागले. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं टू-व्हीलरवरून यावल गावी गेलो. तिकडून परत येत असतांना नशिराबाद गावाजवळ आमची गाडी स्लिप झाली. मी पडले आणि डोकं आपटल्यामुळे बेशुद्ध झाले. रस्त्यावर लोकांची गर्दी जमली.

लोकांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडले. मी थोड्या वेळातच शुद्धीवर आले. शुद्धीवर येताच प्रथम मला आठवण झाली माझ्या पर्सची. त्या पर्समध्ये शेताच्या व्यवहाराची रक्कम होती. तिचे काय झाले असेल ह्याची धाकधूक होतीच. मी पर्स शोधली, तर ती एका बाजूला पडलेली होती. मी माझ्या मिस्टरांना हाताने पर्स दाखविली. त्यांनी ती पर्स लगेच उचलून त्यातली रक्कम तपासून घेतली. सद्गुरु बापूंच्या कृपेमुळे सर्व रक्कम सुरक्षित होती.

रक्कम सुरक्षित असल्याचे पाहिल्यावर आता लक्ष मला झालेल्या इजेकडे गेले. माझ्या डोळ्याला एक इंचाची जखम झालेली होती आणि पाठीला खरचटलेले होते. लोक म्हणत होते की आम्ही तुम्हाला रिक्षाने हॉस्पिटलमध्ये नेतो. परंतु मी म्हटले, ‘‘मला थोडा वेळ शांत बसू द्या.’’ १५-२० मिनिटांनी आम्ही आमच्याच गाडीवरून हॉस्पिटलमध्ये गेलो. नंतर घरी गेलो.

मला सारखे वाटत होते की आता पाच दिवसांनी बापू येणार, मग आपल्या ह्या अवस्थेत आपल्याला सेवेला जाता येणार की नाही? परंतु त्या अकारण करुणामयी सद्गुरुतत्त्वाने मला ह्या पाचच दिवसांमध्ये बरे केले व मला आनंदोत्सवाचा आनंद मिळवून दिला.

बापूंनी मला आणि शेताच्या रक्कमेला सुरक्षितपणे घरी पोहचविले. खरंच! बापू प्रत्येक भक्ताची किती काळजी घेत असतात!
अशा ह्या आपल्या सद्गुरु बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम!!

असाच माझा दुसरा अनुभव. २००६ साली बापूंनी ‘श्रीवर्धमान व्रताधिराजा’ची घोषणा केली. तेव्हापासून मी माझ्या मिस्टरांना दरवर्षी वर्धमान व्रत करायला सांगत असे. परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये शांती, साखरपुडा, व्रतवैकल्यं ह्यांसारखे खूप कार्यक्रम असतात. त्यामुळे वर्धमानव्रतामध्ये पाळावयाचे तूरडाळ, चणाडाळ ह्यांचे पथ्य पाळले जाणार नाही म्हणून ते वर्धमानव्रत करीत नसत.

२०१२ साली मी त्यांना कळकळीने सांगितले की ह्यावर्षी वर्धमानव्रत कराच. त्यांनीही व्रतकाळातील पथ्य न पाळू शकण्याचे भय बाजूला ठेवून अगदी मनापासून वर्धमानव्रत केले आणि मुख्य म्हणजे पथ्यही पाळले.
मिस्टरांनी पहिल्यांदाच व्रताधिराजाचे पालन केले म्हणून मला आनंद तर झालाच. पण खरं तर हे पालन बापुरायानेच त्यांच्याकडून करून घेतले होते - त्यांच्यावर ओढवू घातलेल्या संकटामध्ये त्यांना कवच प्रदान करण्यासाठी, हे आमच्या नंतर लक्षात आले.

वर्धमानव्रताचे उद्यापन झाल्यानंतर दोन दिवसांनी माझे मिस्टर रात्री नऊ वाजता टी.व्ही. पाहत होते. टी.व्ही. पाहता पाहता ते अचानक कॉटवरून खाली पडले. मला एकदम आवाज आला म्हणून मी लगेच तिथे आले. पाहिले तर काय? त्यांना कसलीच शुद्ध नव्हती आणि डोळेही एकदम उघडे पडलेले. मी तर घाबरूनच गेले.

मी त्यांचे डोळे दाबून धरले आणि मुलांना आवाज दिला. ही अशी कोणाची अवस्था आम्ही प्रथमच पाहत होतो. आम्ही त्यांना हलवून उठवत होतो, तरी त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे आता काय होणार, ह्या विचाराने आमचा जीव भेदरून गेला होता.

मी मुलाला लगेच आमच्या घरातील आपल्या संस्थेची उदी आणायला सांगितली. ही उदी त्यांच्या छातीला-कपाळाला लावली. थोडी उदी तोंडामध्ये टाकली.
....आणि थोड्याच वेळात ते शुद्धीवर आले!

त्यांनी आम्हांला विचारले, ‘‘मला काय झाले होते? बरे झाले मी वर्धमानव्रत केले. त्यामुळे आज माझे आयुष्य वर्धमान झाले.’’

आम्ही सर्व बापूभक्त येता-जाता, दुःखात-आनंदात, सोयर-सुतकात उदी लावत राहतो. ही उदी आम्हाला संकटामध्ये कवच प्रदान करते. त्यामुळे आपल्यावरील येणार्‍या संकटांची तीव्रता कमी होते. ह्या प्रसंगात उदीने औषधाचे काम केले आणि आमच्यावर आलेले संकट टळले. खरंच, ‘कलियुग में एक ही त्राता| अनिरुद्धराम रे’.
परमपूज्य बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम !!!
असा सद्गुरु आम्हाला जन्मोजन्मी मिळो!
04:52 samirsinh dattopadhye

Aniruddha Bapu Anubhav - Jalgaon

 - सुनंदावीरा बर्‍हाटे, जळगाव

बाहेरगावच्या श्रद्धावानांसाठी ‘बापू आमच्या गावी येणार’ म्हणजे तो आनंदोत्सवच असतो. मग अशा ह्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी तेथील प्रत्येक श्रद्धावान आसुसलेला असतो. अशावेळी एखाद्या श्रद्धावानाच्या जीवनात अचानक एखादी घटना घडते आणि त्याला वाटते की आपण ह्या आनंदोत्सवाला मुकणार की काय ? पण ती सद्गुरु माऊली असं होऊ देत नाही...

परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!
आम्ही बापूंच्या उपासनेत गेल्या दहा वर्षांपासून येत आहोत आणि खूप आनंद मिळवीत आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला बापूंचे खूप लहानमोठे अनुभव आलेले आहेत. दिनांक १६ ऑक्टोबर २०११ हा आपल्या जळगावच्या अनिरुद्ध उपासना केंद्राचा आनंदोत्सवाचा दिवस होता. ह्या दिवशी बापू जळगावला येणार होते. येथील सर्वच बापूभक्त खूप उत्साही आणि आनंदी होते.

दिनांक १० ऑक्टोबरला मला माझ्या नणंदेच्या शेताच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी यावल ह्या गावी जावे लागले. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं टू-व्हीलरवरून यावल गावी गेलो. तिकडून परत येत असतांना नशिराबाद गावाजवळ आमची गाडी स्लिप झाली. मी पडले आणि डोकं आपटल्यामुळे बेशुद्ध झाले. रस्त्यावर लोकांची गर्दी जमली.

लोकांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडले. मी थोड्या वेळातच शुद्धीवर आले. शुद्धीवर येताच प्रथम मला आठवण झाली माझ्या पर्सची. त्या पर्समध्ये शेताच्या व्यवहाराची रक्कम होती. तिचे काय झाले असेल ह्याची धाकधूक होतीच. मी पर्स शोधली, तर ती एका बाजूला पडलेली होती. मी माझ्या मिस्टरांना हाताने पर्स दाखविली. त्यांनी ती पर्स लगेच उचलून त्यातली रक्कम तपासून घेतली. सद्गुरु बापूंच्या कृपेमुळे सर्व रक्कम सुरक्षित होती.

रक्कम सुरक्षित असल्याचे पाहिल्यावर आता लक्ष मला झालेल्या इजेकडे गेले. माझ्या डोळ्याला एक इंचाची जखम झालेली होती आणि पाठीला खरचटलेले होते. लोक म्हणत होते की आम्ही तुम्हाला रिक्षाने हॉस्पिटलमध्ये नेतो. परंतु मी म्हटले, ‘‘मला थोडा वेळ शांत बसू द्या.’’ १५-२० मिनिटांनी आम्ही आमच्याच गाडीवरून हॉस्पिटलमध्ये गेलो. नंतर घरी गेलो.

मला सारखे वाटत होते की आता पाच दिवसांनी बापू येणार, मग आपल्या ह्या अवस्थेत आपल्याला सेवेला जाता येणार की नाही? परंतु त्या अकारण करुणामयी सद्गुरुतत्त्वाने मला ह्या पाचच दिवसांमध्ये बरे केले व मला आनंदोत्सवाचा आनंद मिळवून दिला.

बापूंनी मला आणि शेताच्या रक्कमेला सुरक्षितपणे घरी पोहचविले. खरंच! बापू प्रत्येक भक्ताची किती काळजी घेत असतात!
अशा ह्या आपल्या सद्गुरु बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम!!

असाच माझा दुसरा अनुभव. २००६ साली बापूंनी ‘श्रीवर्धमान व्रताधिराजा’ची घोषणा केली. तेव्हापासून मी माझ्या मिस्टरांना दरवर्षी वर्धमान व्रत करायला सांगत असे. परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये शांती, साखरपुडा, व्रतवैकल्यं ह्यांसारखे खूप कार्यक्रम असतात. त्यामुळे वर्धमानव्रतामध्ये पाळावयाचे तूरडाळ, चणाडाळ ह्यांचे पथ्य पाळले जाणार नाही म्हणून ते वर्धमानव्रत करीत नसत.

२०१२ साली मी त्यांना कळकळीने सांगितले की ह्यावर्षी वर्धमानव्रत कराच. त्यांनीही व्रतकाळातील पथ्य न पाळू शकण्याचे भय बाजूला ठेवून अगदी मनापासून वर्धमानव्रत केले आणि मुख्य म्हणजे पथ्यही पाळले.
मिस्टरांनी पहिल्यांदाच व्रताधिराजाचे पालन केले म्हणून मला आनंद तर झालाच. पण खरं तर हे पालन बापुरायानेच त्यांच्याकडून करून घेतले होते - त्यांच्यावर ओढवू घातलेल्या संकटामध्ये त्यांना कवच प्रदान करण्यासाठी, हे आमच्या नंतर लक्षात आले.

वर्धमानव्रताचे उद्यापन झाल्यानंतर दोन दिवसांनी माझे मिस्टर रात्री नऊ वाजता टी.व्ही. पाहत होते. टी.व्ही. पाहता पाहता ते अचानक कॉटवरून खाली पडले. मला एकदम आवाज आला म्हणून मी लगेच तिथे आले. पाहिले तर काय? त्यांना कसलीच शुद्ध नव्हती आणि डोळेही एकदम उघडे पडलेले. मी तर घाबरूनच गेले.

मी त्यांचे डोळे दाबून धरले आणि मुलांना आवाज दिला. ही अशी कोणाची अवस्था आम्ही प्रथमच पाहत होतो. आम्ही त्यांना हलवून उठवत होतो, तरी त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे आता काय होणार, ह्या विचाराने आमचा जीव भेदरून गेला होता.

मी मुलाला लगेच आमच्या घरातील आपल्या संस्थेची उदी आणायला सांगितली. ही उदी त्यांच्या छातीला-कपाळाला लावली. थोडी उदी तोंडामध्ये टाकली.
....आणि थोड्याच वेळात ते शुद्धीवर आले!

त्यांनी आम्हांला विचारले, ‘‘मला काय झाले होते? बरे झाले मी वर्धमानव्रत केले. त्यामुळे आज माझे आयुष्य वर्धमान झाले.’’

आम्ही सर्व बापूभक्त येता-जाता, दुःखात-आनंदात, सोयर-सुतकात उदी लावत राहतो. ही उदी आम्हाला संकटामध्ये कवच प्रदान करते. त्यामुळे आपल्यावरील येणार्‍या संकटांची तीव्रता कमी होते. ह्या प्रसंगात उदीने औषधाचे काम केले आणि आमच्यावर आलेले संकट टळले. खरंच, ‘कलियुग में एक ही त्राता| अनिरुद्धराम रे’.
परमपूज्य बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम !!!
असा सद्गुरु आम्हाला जन्मोजन्मी मिळो!